महाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही!

आजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली.

शिवसेनेचेच संस्कार घेऊन मातोश्रीत वाढलेले आणि म्हातार्‍या काकांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत:चे नवीन राजकीय दुकान थाटलेले राज ठाकरे एखाद्या हुकुमशहाच्या थाटात विधाने करत आहेत. राज म्हणतात महाराष्ट्रात दंगली पेटतील, माणसांची कत्तल करून सत्तेचा मोक्ष मिळविण्याचा कानमंत्र त्यांनी गुजरात मध्ये मोदी यांच्याकडून घेतला आहे का? राज बेताल आणि बेफाम सुटले आहेत.

दंगलीची भाषा राज ठाकरेंनी केलीच शिवाय माध्यमांनाही दम दिला.ज्या मातोश्रीच्या थाळीत खाल्ले त्या थाळीत परत एकदा थुंकायलाही त्यांनी कमी केले नाही. उद्धवनेच उत्तर भारतीय नेते मोठे केले असे त्यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी खुशाल मातोश्रीवर जाऊन उद्धवचे कपडे काढावेत.

राज ठाकरे यांची वटवट सहन करण्याएवढा महाराष्ट्र नामर्द आहे का? दंगलीची भाषा करणार्‍या राज ठाकरेना फटके देऊन सरकारने गजाआड करायला हवे. बाळासाहेब ठाकरे यांची वटवट महाराष्ट्राने ४० वर्ष सहन केली. इंदिरा गांधींनी हिसका दाखविल्यानंतर याच बाळासाहेबांनी इंदिराजींचे पाय धरून आणीबाणीचे निर्लज्जपणे समर्थन केले होते. तसा हिसका राजला दाखविण्याची हिम्मत बाबा, दादा आणि आबांच्या सरकारमध्ये आहे काय? निवडणुकीच्या तोंडावर सवंग प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्ये करायची निरुपम आणि ठाकरे यांच्यासारख्यांना सवयच आहे.

आणि ह्याच जागी जर अजित पवारांनी जर असे वक्तव्य केले असते तर सगळ्या भटी प्रसारमाध्यमांनी शेंडीला गाठ मारून देशभर बोंबाबोंब केली असती. आणि मराठा राजकारण, दादागिरी अशी विशेषणे लावली असती. आता हे गप्प का आहेत? राज ठाकरे सारखी माणसे शिवरायांचे नाव घेऊन अखिल भारतीय स्तरावर मराठयांची बदनामी करत आहेत. देशपातळीवरील भटांनी महाराष्ट्रातील माणूस म्हणजे तोडफोड करणारा, बाहेरच्यांना मारहाण करणारा अशी प्रतिमा रंगवली आहे. हे मराठयांना बदनाम करण्याचे नियोजित षडयंत्र आहे.

आणि ह्यांना फक्त गरीब बहुजन कष्टकरी, सिंघ, यादव, पासवान अशा आडनावांच्या उत्तर भारतीयांचेच वावडे आहे. ह्यांना मिश्रा, शर्मा, पांडे ही भट मंडळी चालते. राजसाहेब प्रशासनातल्या ८०% जागा भटांनी बळकावल्या आहेत. जवळपास सगळे उच्च अधिकारी उत्तर भारतीय ब्राम्हण आहेत, त्यांच्या विरोधात कधी तुम्ही बोलणार आहात कि नाही? मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत होता तेंव्हा तुम्ही कुठे होते? तिथला मराठी टक्का कमी होण्याचे कारण तुम्हाला माहित नाही काय? गिरण्या कुणी बंद पाडल्या? त्यांचा हक्काच्या जागा कुणी बळकावल्या हे माहित नाही काय?

आणि हे सगळे सरकारच्या पाठींब्याने सुरु आहे असे वाटत आहे, शिवसेनेला संपवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला खतपाणी घालत असावेत. आबा, जशी तत्परता तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या पोरांनी भांडारकरवर कारवाई केली म्हणून केसेस घालण्यात दाखवली तशी आता का नाही दाखवत? गेली २१ वर्षे मराठा समाजासाठी झटणार्‍या व मराठा सेवा संघ सारखी राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटना चालवणार्‍या पुरुषोत्तम खेडेकरांनी आपल्या समाजाचे नेते समाजाचं काम करत नाही या उद्वेगातून समाजाच्या नेत्यांना कचकावले तर लगेच त्यांच्यावर कारवाई करण्यास पळापळ केली.

पण शिवसेना, मनसे सारखे पक्ष रोज तोडफोडीची भाषा करतात तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ह्यांची पोरं स्टडीत आणि आमची कस्टडीत हे धंदे बंद झाले पाहिजे. मराठी वाढलीच पाहिजे पण त्यासोबत इतर भाषा पण शिकल्या पाहिजे. ग्लोबल झालं पाहिजे. आपले अनेक मराठा बांधव इतर राज्यात पण राहतात, त्यांचे तिथे चांगले व्यवसाय आहेत. हरियाना, बडोदा, इंदौर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू इथे मराठा राहतात. जर त्यांना उद्या तिथल्या लोकांनी हाकलून लावले तर त्यात दोष कुणाचा?

ह्यांनी आपल्या मुलांना अशा वादात अडकवून ठेवले आणि बाहेर राज्यातील व देशातील सगळ्या नोकर्‍या बळकावल्या. सगळ्या मराठा-बहुजनांनी अशा देशविघातक शक्तींच्या नादी न लागता आपली प्रगती साधावी. प्रगतीसाठी घर, तालुका, जिल्हा, राज्य, देश सोडण्याची तयारी ठेवा. ह्यातच आपले व आपल्या समाजाचे कल्याण आहे.

हरी नरकेंचा कांगावा..

Hari Narkeलोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात ‘फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन’ हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांवर ना ना आरोपांचे लेपन करताना आढळतात. आणि हे आरोप तरी कसे, तर वस्तुस्थिती लपवून, संदर्भ सोडून आणि मजकुराच्या आशयाची नरकेंना पाहिजे तशी मोडतोड करून.

‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकाविरुद्ध नोंदविलेल्या गुन्ह्याबद्दल नरके लेखात माहिती देतात. परंतु ती देताना ती स्वत:च्या अंगलट येणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. पुस्तकाविरुद्ध तक्रार करणारे शाम सातपुते हे मराठा असल्याचं आवर्जून लिहिणारे नरके, शाम सातपुते हे गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, ते भाजपचे नगरसेवकदेखील होते, इतकेच नाही; तर बदनाम भांडारकर संशोधन संस्थेच्या नियामक मंडळात हरि नरकेंच्या मांडीला मांडी लावून बसणारे तेदेखील एक सदस्य आहेत, ही सातपुतेंबद्दलची पूरक माहिती दडवून का ठेवतात? की, ती वाचकांसमोर ठेवली असती, तर स्वत:ला पुरोगामी म्हणविणार्‍या नरकेंची अडचण झाली असती?

आता ज्या पुस्तकातील मजकुरावरून हरि नरकेंचा सात्विक संताप उफाळून आला, त्या पुस्तकाबद्दल. पंच्चावन्न पानांच्या त्या पुस्तकात अवघा पाऊण पानाचा मजकूर वादग्रस्त मानला जातो. स्वत: खेडेकरांनी तो नाकारलेला नाही किंवा त्याबद्दल पश्चाताप व्यक्त केलेला नाही. ते एक प्रकारचे प्रतिक्रियात्मक लेखन आहे. ब्राह्मणी जातीयवादी साहित्यात बहुजन स्त्रियांबद्दलच्या अपमानास्पद मजकुराविरोधात खेडेकरांनी लिहिलेला तो पुस्तकातील मजकूर आहे. ब्राह्मणी स्त्रियांबद्दल लिहिल्याबद्दल नरकेंना संताप येत असेल, तर जातीयवादी ब्राह्मणी साहित्यात ब्राह्मणेतर वर्णीयांच्या स्त्रियांबद्दल जो बीभत्स, अपमानास्पद मजकूर आजही उपलब्ध आहे, त्याबद्दल त्यांनी अगोदर ब्राह्मणी जातीयवादी छावणीला जाब विचारला पाहिजे. प्रसंगी त्या विरोधात लढा उभारायला पाहिजे.

परंतु नरक्यांची आजची अवस्था ‘बाटग्याला धर्माभिमान फार’ अशी झाली आहे. आपली मूळची पुरोगामी वैचारिक छावणी सोडून ते जातीयवादी फॅसिस्टांच्या छावणीचे रखवालदार बनले आहेत. साहजिकच, ‘नवब्राह्मणा’ची भूमिका बजावताना त्यांना वारंवार आपल्या निष्ठेची पावती ‘जातीयवादी’ बॉसना द्यावी लागते. ब्राह्मण साहित्यातील स्त्री-उपमर्दाबद्दल प्रतिगाम्यांना जाब विचारण्याचं सोडून, खेडेकरांच्या लेखाबद्दल आकाश कोसळल्यासारखं ते जे वागत आहेत, ते त्यापोटीच.

याच लेखात नरके खेडेकरांबद्दल स्वत:च्या चष्म्यातून पाहिलेली माहिती वाचकांसमोर ठेवतात. तिचा उद्देश खेडेकरांबद्दल निव्वळ गैरसमज पसरविण्याचा आहे. अर्धवट माहिती, त्यावर स्वत:च्या मनाची टीकाटिप्पणी आणि दिशाभूल करणारी वाक्यं यातून नरकेंना काय साध्य करायचं होतं? त्यासंदर्भात नरके खेडेकरांबद्दल रोखठोक का लिहीत नाहीत? खेडेकरांनी शासकीय कर्मचार्‍यांची संघटना काढली, यात नरकेंना खटकण्यासारखं काय वाटतं?

वीस वर्षांपूर्वी मराठा सेवा संघ स्थापन करताना खेडेकर जेथे होते, तेथेच ते आजदेखील उभे आहेत. ब्राह्मणी जातीयवादी वर्चस्ववादाविरुद्ध असलेले त्यांचे विचार पूर्वीइतकेच आजदेखील ठाम आहेत. आणि त्यात बदल होण्याची शक्यता नाही. त्यांचे विचार रोखठोक, स्पष्ट असतात. नरकेंसारखा बोटचेपेपणा, स्वार्थ किंवा लांगुलचालन करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ ही त्यांची श्रद्धास्थानं, तर फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार त्यांची प्रेरणा आहे. त्यांच्या स्पष्ट आणि आक्रमक लिखाणामुळे हजारो मराठा कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी त्यांच्यासोबत उभी राहिली आहे आणि तीच खेडेकरांची ऊर्जा आहे.

आता हरि नरके खेडेकरांविरुद्ध कंठशोष का करतात, तेदेखील पाहिलं पाहिजे. नरकेंच्या वर्तनाचा मागोवा घेण्यासाठी थोडी पाश्र्वभूमी समजावून घ्यावी लागेल. हरि नरकेंनी कितीही नाकारलं तरी त्यांना सार्वजनिक व्यासपीठावर लोकांसमोर येण्यासाठी बामसेफ आणि मराठी सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेड या संस्था संघटनांचाच आधार घ्यावा लागला. ‘बामसेफ’नं तर त्यांना व्याख्यानं आणि अभ्यासासाठी स्वखर्चानं परदेशातही पाठविलं. मराठा सेवा संघानंदेखील अनेक कार्यक्रमांतून त्यांना लोकांसमोर येण्याची संधी दिली.

या सर्व आठ-दहा वर्षांच्या काळात हरि नरकेंची दोन्ही संघटनांबद्दल काही तक्रार नव्हती, किंवा त्यांच्या ध्येयधोरण आणि कार्यक्रमांबद्दलही नरकेंचा विरोध नव्हता. तोपर्यंत दोन्ही संघटना त्यांच्या दृष्टीने पुरोगामी आणि बहुजनवादी होत्या. परंतु मराठा सेवा संघानं मराठयांसाठी  आरक्षणाची मागणी केली अन् पुरोगामी अन् बहुजनवादी म्हणविणारे हरि नरके बिथरले. अन् मराठयांना शिव्याशाप देऊ लागले. मराठयांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करू लागले. वृत्तपत्रातून त्या विरोधात लेख लिहू लागले. आणि खेडेकरांमधील दोषही त्यांना बहुधा याचवेळी दिसू लागले.

ओबीसी वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठे आरक्षण मागत असतील, तर त्यांना विरोध करण्याचं नरकेंना काय कारण? ते स्वत:ला पुरोगामी अभ्यासक म्हणवतात, तर मूठभर सरंजामदार मराठा वर्ग सोडला तर ग्रामीण भागात हजारोंच्या संख्येत आत्महत्या करणारा गरीब, मागास मराठा त्यांना आरक्षणपात्र वाटत नाही. पण हे वास्तव ध्यानी घेऊनही सामाजिक सौहार्दासाठी नरकेंनी त्यांचा विरोध सोडला नाही. उलट, ते समस्त मराठयांचीच आरक्षणाच्या मुद्यावरून खिल्ली उडवू लागले.

याच सुमारास नरकेंचे राजकीय बॉस छगन भुजबळ यांनी डोंबिवली येथे एका भाषणात ‘ब्राह्मणांनी महात्मा फुलेंचा छळ केला नाही’ असं जाहीरपणे सांगून ब्राह्मणी छावणीशी हातमिळवणी करण्याचा संकेत दिला. नरकेंचे राजकीय बॉस अशा रीतीने ब्राह्मण शरण बनल्यामुळे हरिभाऊंनाही त्याच मार्गानं जाणं आलं. त्यातून मग ते नवनव्या ‘मराठा’ विरोधी समीकरणांना जन्म देऊ लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘माधवं’ सूत्राचा मराठयांविरुद्ध वातावरणनिर्मितीसाठी वापर करू लागले. ब्लॉगवर ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद संपला. आता महाराष्ट्रात मराठे-मराठेतर वाद पेटणार’ अशी कुडमुडी भाकितंही करू लागले.

जेम्स लेन प्रकरणी महाराष्ट्रातील वातावरण प्रक्षुब्ध बनलं असता ‘जिजाऊंच्या प्रतिष्ठेसाठी अशा एक नाही तर हजार भांडारकर संस्था जाळाव्या लागल्या तरी जाळू’ असं म्हणणारे पुरोगामी हरि नरके, नुकत्याच घडलेल्या पुण्यातील दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी ब्राह्मणांची वकिली करताना मात्र कसे प्रतिगामी बनले, हे चळवळीतील कार्यकर्ते विसरलेले नाहीत. आपल्या लेखासाठी नरकेंनी पुस्तकाची निवड स्वत:च्या सोयीनं केली आणि फॅसिस्ट तंत्रानुसार संपूर्ण पुस्तकातील एक-दोन वाक्य घेऊन त्याच्यातून स्वत:ला सोयीचे वाटतील असे अर्थ काढून खेडेकरांविरुद्ध राळ उडविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामागे विचारांपेक्षा नरकेंचा विकारच अधिक आढळतो, हे खेदजनक आहे.

एके ठिकाणी नरके लिहितात, ‘हिटलरशाहीप्रमाणेच प्रतिज्ञा मराठा व बहुजनांच्या मनावर कोरावी लागेल. विचारांच्या लढाईला दणक्यांची जोड पाहिजेच. म्हणून भांडारकर तो झाँकी है, या ब्रिगेडनं दिलेल्या नार्‍याचा अर्थ समजावून घ्या.’ एवढं लिहून नरके पुस्तकातील बाकीच्या आशय-संदर्भाला बगल देऊन खेडेकरांचा आदर्श हिटलर असल्याचं जाहीर करतात. खेडेकरांनीच तशी कबुली दिल्याची फोडणीही ते न विसरता देतात. संदर्भ सोडून वा जे गृहित धरता येत नाही ते गृहित धरून खेडेकरांवर एकतर्फी आरोपपत्र ठेवण्याचा अधिकार नरके स्वत:कडे कशाच्या आधारावर घेतात?

त्याच परिच्छेदात ते अ‍ॅड. रूपवते यांच्याबद्दल अकारण जिव्हाळा दाखवितात अन् खेडेकरांना इशारा देतात. का, तर अ‍ॅड. संघराज रूपवते हे दादासाहेब रूपवतेंचे चिरंजीव आहेत, आणि दादासाहेब यांना डॉ. आंबेडकरांचा सहवास लाभला, असा बादरायण संबंध ते आंबेडकरवादाशी जोडतात. वास्तविक, अ‍ॅड. संघराज रूपवतेंनी जेम्स लेन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ब्राह्मणी जातीयवादी छावणीच्या बाजूनं बाजू मांडणं, हेच गर्हणीय होते. एका अर्थी ती बहुजन विघटनाला मिळणारी साथ ठरेल, असं खेडेकरांचं म्हणणं. त्या विचारातून त्यांनी पुस्तकात स्वत:चं मत व्यक्त केलं. मात्र, त्यांचंही भांडवल नरकेंनी केलं आणि खेडेकरांविरुद्ध गरळ ओकली.

संपूर्ण लेख वाचल्यानंतर हरि नरकेंना खेडेकरांची वा पर्यायानं मराठाद्वेषाची कावीळ झाल्याचं स्पष्ट दिसतं. फुटकळ वाक्य घेऊन त्यातून त्यांनी आकाश कोसळून पडल्यासारखे अर्थ काढले आहेत. अर्थात, लोकांना भडकावण्याचा मनसुबा ठेवूनच त्यांनी लेख लिहिला आहे, हे देखील लपून राहात नाही. आंबेडकरवादी काय, ठाकरे काय, हिटलर काय, पवार काय, ब्राह्मण काय.. खेडेकरांविरुद्ध जेवढ्यांना म्हणून चिथवता येईल, तितक्यांना चिथावण्याचा त्यांनी मुद्दामहून प्रयत्न केलेला दिसतो. अर्थात तीव्र द्वेष वा सूडभावना मनी ठेवून लिहिल्यावर त्यांना यापेक्षा वेगळं काय लिहिता येणार होतं?

आंबेडकरांविरुद्ध आजही कुजबूज मोहीम चालवून त्यांची बदनामी करणारा एक वर्ग समाजात आहेच ना? आदरणीय बाबासाहेबांबद्दल खेडेकरांनी ‘बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात लिहिलं : ‘महार समाजानं ब्रिटीशांना मदत केली याचा प्रचंड राग ब्राह्मणांना आहे. पुढं इंग्रज भारतातून गेल्यावर ब्राह्मणांनी गांधी हत्या घडवून आणली. परंतु डॉ. आंबेडकर या महारानं देशाची समतावादी राज्यघटना लिहून ब्राह्मणांच्या हक्क-अधिकारांवर गंडांतर आणलं, म्हणून ब्राह्मणांनी डॉ. आंबेडकरांची हत्या घडवून आणली.’ खेडेकरांनी लिहिलं यात नरकेंनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे? महार पलटणींनी इंग्रजांना सहकार्य करून भीमा-कोरेगावच्या लढाईत पेशवाईचा खेळ संपवला, हा इतिहास आहे. त्यांनी इंग्रजांना सहकार्य का केलं याचं सोशियो ऑडिट हरि नरके करतील तर बरेच होईल.

तथापि, नरकेंच्या कुचाळक्या इथंही दिसून येतात. लेखातील मजकुराचा आशय वा संदर्भ याकडे दुर्लक्ष करून ते ‘खेडेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम जातीवाचक उल्लेख करण्याची काय गरज होती, तेच कळत नाही.’ असं आगलावं वाक्य लिहितात. डॉ. आंबेडकरांच्या कार्याचं दोन वाक्यात यथार्थ मूल्यमापन करणार्‍या खेडेकरांचा त्यांच्याबद्दल असणारा जिव्हाळा अन् नरकेंसारख्या ‘नवब्राह्मणाच्या’ डोक्यातील विकृत जातीयवादी विचार, यातून नरकेंचा रोख कुणाच्याही लक्षात यावा.

व्यक्तिगत द्वेषाची कावीळ झालेले हरि नरके मराठा सेवा संघात फूट पडावी, यासाठी घायकुतीला आल्यासारखे दिसतात. ती त्यांची सुप्त इच्छा असावी. मात्र तसं घडताना दिसत नाही. ज्या संघटनेचा वापर करून नरके सार्वजनिक व्यासपीठावर नाव कमावते झाले, त्या मातृसंस्थेबद्दल नरकेंची अपकारभावना ध्यानी घेण्यासारखी आहे. एखाद्याच्या मदतीबद्दल उपकृत राहण्याऐवजी मदतकर्त्यांलाच सुरुंग लावण्याचा विचार पुरोगामी नाहीच. पण अशा विचार आणि व्यक्तींबद्दल ‘विश्वासघातकी’ याच विशेषणाचा उपयोग केला जातो.

नरके आज मराठा सेवा संघ वा संभाजी ब्रिगेडच्या हितचिंतक, पाठिराखे वा सहानुभूतीदारांना भेटतात आणि त्यांचा जमेल त्या मार्गाने पाठीराख्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. तरीदेखील संघटनेत उभी फूट पडत नसल्याचं पाहून ते काहीसे चिडचिडे झाले आहेत. खेडेकरांच्या पुस्तकातील मते ही लेखक म्हणून स्वत: खेडेकरांची आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन खेडेकर त्यांना जे योग्य वाटेल, ते लिहू शकतात. परंतु नरके खेडेकरद्वेषानं अगदी अंध झाले असावेत. खेडेकरांनी काय लिहावं, काय लिहू नये हे सांगण्याचा नरकेंना काहीच अधिकार नाही.

‘बहुजनहिताय’ या पुस्तकातील खेडेकरांची काही मते नरके लेखात नमूद करतात. ते लिहितात : ‘खेडेकर म्हणतात, औरंगजेबानं बापाला तुरुंगात टाकून मारलं. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारित केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवलं, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्त्या करून महापाप केले आहे. शारीरिक हत्या ही राज्यकारभारात क्षम्य असते. परंतु सामान्य जनतेच्या उत्थानासाठी असलेली विचारधारा नष्ट करणे यास क्षमा नाही. या मापदंडानुसार बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षाही जास्त अपराधी ठरतात. कारण त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना रामदासांच्या दावणीला बांधली. आपल्याच बापाशी प्रतारणा करणारे बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख आहेत.’ वगैरे वगैरे.

खेडेकरांच्या अशाही लेखनाकडे नरके जेव्हा टीकायोग्य दृष्टीने पाहतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते. आणि ते पुरोगामी चळवळीचे वगैरे नसून त्यांच्यात एक इरसाल डँबिसपणा असल्याचं जाणवतं. या मजकुरात नरकेंना टीकायोग्य काय दिसलं? ठाकरे हे बहुजन तरुणांच्या जिवावर ब्राह्मणधार्जिणे राजकारण करतात, हे स्वत:ला चळवळीचे म्हणवून घेणार्‍या नरकेंना ठाऊक नाही काय? त्याचं जळजळीत उदाहरण म्हणजे ज्या शिवरायांचं नाव घेत ठाकरेंनी चाळीस वर्ष राजकारण केलं, त्या शिवरायांची बदनामी झाली असताना मूग गिळून बसलेले ठाकरे नरकेंना दिसले नाहीत? अन् याच ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या धोरणाचा निषेध म्हणून नरकेंचे राजकीय बॉस छगन भुजबळ शिवसेना सोडून बाहेर पडले होते ना? प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा बाळासाहेबांनी स्वीकारला नाही, प्रबोधनकारांनी ज्या भटी धर्माविरुद्ध एल्गार पुकारला, त्याचा पाच टक्केही अंश बाळ ठाकरेंच्या विचारात दिसत नाही. मग ती मुलानं बापाच्या विचारांची केलेली हत्त्या ठरत नाही तर काय ठरते?

तथापि, नरके झोपेचं ढोंग वठवीत आहेत. त्यांना जाग कशी येणार? टीका करण्यासाठी मुद्दादेखील असावा लागतो. परंतु ओढून-ताणून मुद्दा निर्माण करायचा, अन् त्यावर उठवळ टीकाटिपप्णी करून स्वत:च्या पांडित्याचं प्रदर्शन करण्याची हौस भागवून घेण्याची नरकेंना उबळ येत असावी. त्यांनी लिहिलेल्या संपूर्ण लेखातून त्यांच्या विचारांचा उथळपणा दिसून येतो. कुठंही वैचारिक खोली, प्रगल्भता आणि प्रतिविचार मांडलेला आढळून येत नाही. हे कसलं टीकात्मक लेखन! फार तर त्यांना खेडेकरांबद्दल जो राग आहे, त्यांच्या विरोधात जी मळमळ व्यक्त कराविशी वाटली ती नरकेंनी व्यक्त केलीय. त्याला द्वेष आणि सूडबुद्धीचा वास येतोय. अन् लिखाणातून तो जाणवतोय एवढंच! अशा थिल्लर लिखाणातून कोणाला काय बोध मिळणार!

फुलेविचार म्हणजे हरि नरके व्यक्तिगत संपत्ती समजत असावेत. आपल्याविना समाजात कोणी दुसरा फुलेविचारांचा पुरस्कर्ता असू शकेल, असं ते समजत नसावेत. त्यांना इथं सांगावंसं वाटतं की, महात्मा फुले ही आता केवळ माळी समाजाची ठेव नाही, तर अखिल भारतीय स्तरावर फुले-आंबेडकर विचारांनी सामाजिक घुसळण सुरू केली आहे. आणि भविष्यात केवळ या विचारांच्या धक्क्यानंच अनेक राज्यशकटं कोसळून पडणार आहेत. परंतु त्या फुल्यांच्या गावातच त्यांच्या नावानं राजकीय दुकानदारी सुरू व्हावी अन् त्या दुकानदारीत स्वत:ची भागीदारी नरकेंनी ठेवावी, हे उद्वेगजनक वाटतं.

‘हिंदू राष्ट्र’ हे ज्याचं स्वप्न आहे आणि स्वत:च्या जात-वर्ण हितापलीकडे ज्यांनी देशातील बहुजनांचा कधी विचार केला नाही, ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी स्वातंत्र्यलढयाकडेही पाठ फिरविली, ज्यांनी मनुस्मृती, पुराणे आणि देवळं यांचा आधार घेत बहुजनांना नागवणं आजही चालू ठेवलं आहे, ज्यांनी वर्णवर्चस्व लादून कोटय़वधी बहुजनांना विकासवंचित ठेवलं, ज्यांनी विषमतेचा पुरस्कार करून धर्मा-धर्मात आणि जाती-जातीत भांडणं लावून देश अस्वस्थ केला, जे आजही बहुजनांच्या प्रेरणांची, महानायकांची खुलेआम निंदानालस्ती करतात, जे आजही धर्माच्या नावाखाली बहुजन तरुणांच्या हातूनच बहुजनांचाच वंशसंहार घडवून आणतात आणि मोदी, ठाकरे, बजरंग दल, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी, ज्या प्रवृत्तीचा उदो उदो करीत निरपराध भारतीयांचं शिरकाण करतात, त्या प्रवृत्ती अन् ती माणसे यांच्याविरोधात खेडेकर बोलतात तेव्हा ब्राह्मणधार्जिण्या नरकेंना राग येतो. मात्र, या देशविघातक तत्वांविरुद्ध बोलण्या-लिहिण्याचं धाडस या ‘नवब्राह्मण हरिभाऊ’त नाही. याला ‘वैचारीक बाटगेपणा’ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?

-भैय्या पाटील
bhaiyapatil88@gmail.com

अण्णा हजारे: द फ्रॉड गांधी

सध्या जिकडे तिकडे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची चर्चा सुरु आहे. अण्णा दुसरे गांधी असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमे करतायत. अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या “गावचे” समाजसेवक, गांधींच्या मार्गावर चालणारे अशी त्यांची ख्याती आहे. सध्या २६-११ नंतर मेणबत्त्या मिरवणारे अण्णांसाठी सुद्धा मेणबत्त्या परजून रस्त्यावर आलेले आहेत. अण्णांची प्रमुख मागणी आहे लोकपाल विधेयक. जे भ्रष्टाचाराविरुद्ध थेट कारवाई साठी जन लोकपाल या पदाच्या निर्मितीसाठी आहे.

ह्या विधेयकामुळे जन लोकपाल नावाचे एक स्वतंत्र संस्था निर्माण होईल, जिच्यावर कुणाचेच नियंत्रण असणार नाही. आणि हे जन लोकपाल कुणाचीही कधीही चौकशी करू शकतील पण कुणाला त्याविरोधात दाद मागता येणार नाही. एकूणच हे एक समांतर न्याय व्यवस्था असणार आहे. अण्णांच्या म्हणण्यानुसार हि समिती लोकांच्या नियंत्रणात असणार आहे, हे लोक कोणते तर  १)दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष २)सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश ३)हायकोर्टाचे दोन वरिष्ठ मुख्य न्यायाधीश ३)भारतीय वंशाचे नोबेल विजेते ४)राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष ५)भारतीय वंशाचे दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते ६)भारताचे महानियंत्रक आणि लेखापाल. आता हे लोक फितूर होणार नाहीत याची हमी कोण देणार?

मॅगसेसे पुरस्कार हि भारतीय राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची पात्रता होऊ शकते काय? आणि ह्यातून अनिर्बंध शक्ती मिळाल्यामुळे हुकुमशाहीचा धोका निर्माण होणार नाही याची खात्री काय? आणि गेली ४२ वर्षे हे विधेयक पडून होते, मग अण्णांना आजच एवढा आततायीपणा करण्याची गरज काय होती? अण्णांचा मूळ हेतू तपासण्याची गरज आहे. विधेयकाच्या मसुदा समितीवर जनतेचे प्रतिनिधी म्हणून अरुण केजरीवाल, अण्णा हजारे, प्रशांत भूषण, संतोष हेगडे हे आहेत. मी म्हणतो यांना जनतेने प्रतिनिधी म्हणून कुठं निवडलंय? ते संसदेत बसलेले हरामी जनतेचे प्रतिनिधीच आहेत, मग ह्या वेगळ्या ५ जणांची गरज काय? आणि हे आमच्या भल्याचाच विचार करतील कश्यावरून?

सगळ्यात कहर म्हणजे, शांती भूषण नावाचा इसम मसुदा समितीचा उपाध्यक्ष आहे. ह्याने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील २ आरोपींचे वकील म्हणून काम केलेले आहे. आणि ह्याने २००१ मध्ये संसद हल्ल्यातील आरोपी शौकत हुसेन गुरु याला झालेल्या शिक्षेविरुद्ध अपील केले होते! मुस्लिमांच्या विरोधात विनाकारण बोंबाबोंब करणारे संघ-भाजप-सेना सगळे चूप का आहेत? एका देशद्रोही वकिलाला देशातील एका सर्वोच्च लोकसंस्थेत मसुदा तयार करण्याचे काम कसे मिळू शकते? शिवसेनाप्रमुख अण्णांना वाकडया तोंडाचा गांधी म्हटले होते, मग आता शिवसेनाप्रमुखांनी अण्णांची बाजू कशी काय घेतली? आणि हे विधेयक १९६९ पासून प्रलंबित आहे मग सेना-भाजपचे सरकार असताना त्यांनी हे विधेयक का पारित केले नाही?

मुळात जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी अण्णांची हि “पेड” खेळी आहे. देशातल्या ३५ कुटुंबांकडे ७९६८ अब्ज रुपये संपत्ती आहे, पौष्टिक अन्न न मिळाल्यामुळे भूकबळीमुळे ६ दिवस ते ६ महिन्याच्या आत ५०% बालकांचा मृत्यू होतो, मंदिरांची वार्षिक कमाई ८३ लाख कोटी रुपये आहे, पण अण्णा कधीच या प्रश्नांवर बोलत नाहीत. देशातील सगळ्यात भ्रष्ट व्यवस्था, न्याय व्यवस्था आहे त्याविरोधात बोलत नाहीत. अण्णा कधी अंधश्रध्दा निर्मुलन विधेयक, मंदीर अधिग्रहण कायदा या कायद्यासाठी का आंदोलन करत नाहीत? बुवाबाजी,अंधश्रद्धा,जंतर-मंतर यावर का बोलत नाहीत?

अण्णांना पाठींबा देणार्‍यांमध्ये “राज”योगी रामदेव बाबा हि आहेत. त्यांच्या करणी लवकरच एक लेख लिहून समोर आणणारच आहे. पण अण्णा मनुवाद्यांना हाताशी धरून बहुजन नेत्यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम राबवत आहेत. अण्णांनी खुशाल शरद पवारांच्या विरोधात उपोषण करावे, पण कधीतरी कलमाडी आणि शीला दीक्षित वरही बोलावे. आमच्या “एकंदरीत” सगळ्या आंबेडकरवाद्यांना साधा प्रश्न पडत नाही कि शुद्र अशोक चव्हाण आणि अतिशूद्र  दलित ए.राजा यांचे पद निव्वळ आरोपावरून जाते पण दीक्षित आणि कलमाडी या ब्रम्हसमंधांच्या पदाला धक्का लागत नाही.

अण्णांचे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणे हास्यास्पद आहे. अण्णांनी मागे सुरेश जैनांविरुद्ध उपोषण सुरु केले होते, जैनांनी उलट अण्णांच्या ट्रस्टची चौकशी व्हावी म्हणून उपोषण सुरु करताच अण्णांनी आपले उपोषण गुंडाळले होते. आजही सुरेश जैन अण्णांना महाचोर म्हणतात. अण्णा यांनी आपल्या उपोषण स्थळामागे जे पोस्टर लावले होते त्यावर गांधी आणि झाशीची लक्ष्मीबाई होती. आता गांधींनी सत्यशोधक चळवळ गिळंकृत करून बहुजन समाजासोबत फ्रॉड केला, आणि आता अण्णा हे फ्रॉड गांधी आहेत म्हणजे डबल फ्रॉड आहेत.

अण्णांनी मागे राज ठाकरेंच्या परप्रांतीय विरोधी आंदोलनाचे समर्थन केले होते, अश्या संकुचित विचारांचा माणूस देशाच्या भल्याचा विचार कसा काय मांडू शकतो? अण्णा क्रिकेट मध्ये देशाची तरुणाई वेळ वाया घालवते, क्रिकेट मध्ये अफाट पैसा अफरातफर केला जातो. सध्या आय.पी.एल. सुरु आहे त्यात एका एका खेळाडूसाठी साठी करोडो रुपये लावलेले आहेत. त्याविरुद्ध बोला ना अण्णा. अण्णा, आपल्या देशात न्याय यंत्रणा असताना कोणालाही अपराधी ठरविण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? काहीतरी बोला अण्णा, तरुण भरकटत चालले आहेत.. त्यांना दिशा द्या.. सुपारी घेऊन उपोषणे करण्याचा धंदा सोडा आता अण्णा..

वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

समस्त वारकर्‍यांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा काळ स्मृती दिन होता! त्यांच्या पवित्र कार्याला वंदन! संत तुकाराम बीजेनिमित्त आलेला दै.देशोन्नती मधील लेख साभार..

Jagatgru Sant Tukaram

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !!

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !!

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर.!!

गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाटय, लोकनाट्य, कादंबर्‍या, चित्रपट गीते, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. अण्णाभाऊ मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्यातला मराठी माणूस जागा करीत होते.

अण्णाभाऊंची एकूण पुस्तके/ग्रंथ संख्या “७७” आहे,

अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान देखील झाला.

तमाशात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी नाकारून मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी,

“प्रथम मायभूच्या चरणा,
छत्रपती शिवबा चरणा,
स्मरोनी गातो | कवना ||”

“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली” हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाऊंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्य दृष्टीमुळेच साकार झाला.

१६ ऑगष्ट १९४७ साली “यह आझादी झुठी है, इस देश कि जनता भूखी है!” असा नारा शिवाजी पार्क वर दिला तेव्हा त्या दिवशी रौद्र रूप धारण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही, तरी अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.

अण्णाभाऊंच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकीर या सात कादंबर्‍यांवर मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले.

अण्णाभाऊंना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले !!

याउलट, कुसुमाग्रज हे पुण्यातील श्रीमंत घरातील होते पुण्यात शिक्षण झाले तसेच उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये, पुढील आयुष्य अमराठी लोकांची चाकरी करण्यात घालवली, तसेच १४(कादंबरी, ललित लेख, कविता संग्रह, नाटक)+अनुवादित बरेच लिखाण केले, पण कुठेही मराठी, भूमिपुत्र, संघर्ष, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या नाहीत शिवाय त्यांना पेशवाई व बामन शाहीची आग नव्हती, आणि सांगतात आयुष्य भर मराठी ची सेवा केली, त्यांना ८७ वर्षाचे आयुष्य लाभले….!!

….पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात, परंपरागत निरक्षर वातावरणात, वाईट-रुढ्या परंपरा जोपासणार्‍या समाजात, धर्मानेच शिक्षण-सत्ता-संपती नाकारलेल्या समाजात, अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात, शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या जातीत जन्माला येऊन संपूर्ण जगाला ज्ञानी व स्वावलंबी करणारे महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, बहिणाबाई, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, डॉ. सरोजिनी बाबर, संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृ.बा. बाबर, अश्या अनेक बहुजनांनी कुसुमाग्रजांपेक्षा लाखो पटीने लिखाण केले, मराठी भाषाच नव्हे तर भाषा-प्रांत समुद्ध केला, ते कोणीही बामन नव्हते हीच कमतरता आहे.

म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील मराठी साहित्य, शिवचरित्र परदेशात प्रसार करणार्‍या साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्मदिन १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !!

-शिवश्री विकासराव चव्हाण