गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..

लोकप्रिय दैनिक देशोन्नती मधील गुढीपाडव्याचे रहस्यभेद करणारा अमोल मिटकरी यांचा खळबळजनक लेख. गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..

Gudhpadwa Gudh Rahasya

वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हा प्रवक्ता अमोल मिटकरी यांचा दैनिक देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणी मधील वाघ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा सडेतोड लेख..

(लेख मोठया स्वरुपात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा..)

Waghya Kutryache Rahasya

“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥

या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, संत नामदेव यांच्या विचारसरणीला प्रमाण मानून आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने ह्या ब्लॉगने आज एक लाख वाचकांचा टप्पा ओलांडला आहे.

भारतात असलेल्या विषमतावादी वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात मराठा-बहुजनांच्या अनेक महापुरुषांनी कार्य केले. जैन धर्माच्या स्थापनेपासून ते शिवधर्माच्या प्रकटनापर्यंत अजूनही हा संघर्ष सुरूच आहे. त्या संघर्षात सत्यशोधक नेहमीच आपले योगदान देत राहील. बर्‍याच कडू-गोड अनुभवांना सामोरे जात प्रबोधनाचे काम सलग तिसर्‍या वर्षीही सुरु ठेवल्याचा आनंद मनात आहे. जगातील १० देशांमधून हा ब्लॉग वाचला गेला. ६३% वाचक हे सर्च इंजिनच्या माध्यमातून ब्लॉगपर्यंत पोचले. फेसबुकच्या माध्यमातून तर आमच्या हातात एक नवे माध्यमच लागले आहे. ब्राम्हणी प्रचार-प्रसार माध्यमे इथे चालणार्‍या बहुजन चळवळीचे काम हायलाईट करत नाहीत. फेसबुकच्या माध्यमातून हा ब्लॉग आणखी जास्त वाचकांपर्यंत पोचवता आला.

ब्लॉग चालवताना इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेचा अधिक कटू अनुभव आला. वेळ आली कि एकजात सगळे चांगले-वाईट ब्राम्हण कसे एकत्र येतात याचा अनुभव आला. ते त्याच्या चुका मान्य करत नाहीतच पण चुका सांगणार्‍यालाच गुन्हेगार घोषित करून मोकळे होतात. सुरुवातीला ब्लॉग लोकांपर्यंत पोचण्यासाठी मराठी ब्लॉग विश्व हि साईट एकमेव माध्यम म्हणून वापरली. पण तेथील सगळ्या ब्राम्हणांनी (लोकशाहीच्या गप्पा करणार्‍या!) माझा ब्लॉग बॅन करायला साईट मालकाला भाग पाडले. जेम्स लेन प्रकरणी विचारांचा प्रतिवाद विचारांनी करायला सांगणार्‍या पंडित अटल बिहारीचे समर्थक भाऊबंद असे वागताना पाहून मजा वाटली व चीडही आली. त्यामुळे मला सर्च इंजिन ओप्टीमायजेशन शिकता आले आणि माझी वाचकसंख्या टिकून राहिली. ब्लॉगची गुगल पेजरँक ३ आहे. गुगल, वर्डप्रेस, व इतर सर्व ओपन सोर्स (बौद्धिक नियंत्रण मुक्त) साईट्सची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच व्यक्तीस्वातंत्र्य आम्हाला इंटरनेटवर उपभोगण्यास मिळते.

युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे तर आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी शेती आणि क्रिकेट याच्या पलीकडच्या जगात आम्हाला डोकावायला शिकवले. आणि कधी नव्हे ती मराठयांची पोरे विचार करायला लागली. फुकट दिलेले पुस्तक न वाचणारे पुस्तक विकत घेऊन वाचायला लागले, लिहायला लागले. आणि महाराष्ट्रात नव्हे देशात होणार्‍या दंगली बंद झाल्या. आरक्षण म्हणजे कुबड्या समजणारा समाज आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हे समजून घेण्याइतपत प्रगल्भ झाला. गेल्या हजारो वर्षात हार न पाहिलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेला दादू कोंडदेवच्या माध्यमातून थेट हादरा दिला.

हा ब्लॉग चालवताना अनेक मित्रांनी व चळवळीतील सहकार्‍यांनी मदत केली. माझा बंधुमित्र निखील देशमुख (औरंगाबाद) याने ब्लॉग satyashodhak.com करायला व स्वतंत्र सेल्फ होस्टेड ब्लॉग बनवण्यासाठी मदत केली. प्रकाश पोळ (कराड) यांनी चर्चा करून लेख आणखी चांगले होण्यास मदत केली. डॉ. बालाजी जाधव (औरंगाबाद), नितीन सावंत (परभणी), विकासराव चव्हाण (मुंबई), विशाल भोसले (लातूर), भैय्या पाटील (पुणे), अभय पाटील (बुलडाणा), अमरजित पाटील (पंढरपूर), अनिल माने (बारामती), पुरुषोत्तम जाधव (बीड), प्रदीप इंगोले (हिंगोली), संजीव भोर (अहमदनगर), संतोष गायधनी (नाशिक), सतीश काळे (पिंपरी-चिंचवड), प्रकाश पिंपळे (मुंबई), सुनील चौधरी (जळगाव) व अशा अनेक चळवळीतील हितचिंतक व सहकार्‍यांनी चर्चा करून ब्लॉग अधिक चांगला होण्यास मदत केली. इतःपर त्यांचे आभार न मानता मी सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छितो.

शेवटी या देशात फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत समाजरचना निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन देतो. व हा छोटासा लेख पूर्ण करतो.

जय जिजाऊ!

-विनीत

कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या!

पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली।
चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली॥

पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिंग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणार्‍या अशा अनेक चंचल नारी मराठी साहित्यक्षेत्रात मानाचे पान घेऊन मिरवत आहेत. या चंचलांमुळे मातीतले अस्सल साहित्यिक उपेक्षेच्या गर्तेत खितपत पडले आहेत. अशा चंचलापैकी एक नाव आहे कुसुमाग्रज उपाख्य वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रजांना महान नाटककार, महाकवी, कथाकार, कादंबरीकार अशी झाडून सगळी सर्वोच्च बिरुदे लावली जातात. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या नावे जनस्थान पुरस्कारही दिला जातो. त्यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हे थोडे म्हणून की काय, कुसुमाग्रजांना देवत्व बहाल करून पावित्र्याच्या मखरात बसविण्यात आले आहे.

या सर्व गोष्टींचा इतका अतिरेक झालाय की, त्यांच्या साहित्याची खरी समीक्षा करणे हे मराठी सारस्वताच्या दरबारातले सर्वांत मोठे पाप होऊन बसले आहे. कोणत्याही प्रकारची समीक्षा न होता, एका व्यक्तीला अशा प्रकारे देवत्व बहाल करण्याचे उदाहरण जगातील कोणत्याही भाषेच्या इतिहासात सापडणार नाही. तथापि, बुद्धी शाबूत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे वागून चालत नसते. योग्य समीक्षा करूनच माणसाची महत्ता ठरायला हवी. कुसुमाग्रज या नियमाला अपवाद ठरू शकत नाहीत. त्यामुळेच मी कुसुमाग्रजांच्या महानपणाची समीक्षा करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेतला. तेव्हा या माणसाच्या महानपणाची सारीच वस्त्रे उसणी असल्याचे दिसून आले. ही उसनी वस्त्रे बाजूला सारून खरे कुसुमाग्रज महाराष्ट्राला कळायला हवेत. उद्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी वर्षाचा शेवट होत आहे. या मूहुर्तावर त्यांची यथायोग्य समीक्षा करण्यासाठी मी बसले आहे. या लेखामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावणार आहेत. तथापि, सत्य जगासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसंगी हितसंबंधी संधीसाधूंचा वाईटपण कोणाला तरी घ्यावा लागणार आहे.

माझी ही अल्पशब्दांतील प्रस्तावना वाचून कुसुमाग्रजांसाठी बोलबच्चनगिरी करणार्‍या मुखंडांना धक्का बसला असेल. तथापि, अनिता पाटील पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही, हे या बोलबच्चनांनी लक्षात ठेवावे. अशा प्रकारे पावित्र्याच्या मखरात बसविलेली +श्यामची आई+ कशी जातीयवादी आहे, हे मी पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहे. आज नंबर आहे. कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर. (विष्णू वामन शिरवाडकर हे कवितेसाठी कुसमाग्रज हे नाव वापरीत तसेच नाटके व इतर लेखनासाठी वि. वा. शिरवाडकर हे नाव वापरीत.)

कुसुमाग्रजांच्या बोगसपणाचे बिंग फोडण्यासाठी त्यांची महत्ता कोणत्या कलाकृतींच्या आणि निकषांच्या आधारे ठरविली गेली, हे आपण आधी पाहू. कुसुमाग्रजांची सर्वश्रेष्ठ कलाकृती कोणती? नि:संशय नटसम्राट. नटसम्राट ही मराठीतील अजरामर कलाकृती असल्याची टिमकी वाजवली जाते. त्यासाठी कुसुमाग्रजांना नाट्य लेखन क्षेत्रातील चक्रवर्ती सम्राट अशी उपाधी त्यांचे भाविक भक्त लावतात. परंतु नटसम्राट हे नाटक स्वतंत्र अनुभवांवर उभे नाही. ते शेक्सपिअरच्या किंग लिअर या नाटकाचे रूपांतर आहे. शिरवाडकरांनी किंग लिअर मराठी पेहरावात उभे केले एवढेच त्यांचे कर्तत्व. किंग लिअरच्या जागी त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर उभा केला. तथापि, अप्पासाहेब बेलवकर भाषा बोलतो ती किंग लिअरचीच. मूळ कथेत अनेक फेरबदल नटसम्राटमध्ये करण्यात आले आहेत. तसेच शेक्सपिअरच्या इतरही अनेक नाटकांमधून संवादांची उचल शिरवाडकरांनी केली आहे. अप्पासाहेब बेलवलकरांचा ‘जगावं की मरावं हा एकच सवाल’ हा अत्यंत प्रसिद्ध संवाद शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकातून अगदी जशाच्या तसा उचलला आहे. शेक्सपिअरच्या “To be, or not to be, that is the question” या संवादाचे हे शब्दश: भाषांतर आहे.शेक्सपिअरच्या लेखनीतून उतरलेला हा मूळचा संपूर्ण संवाद वाचकांसाठी खाली देत आहे :

To be, or not to be, that is the question:
Whether ’tis Nobler in the mind to suffer
The Slings and Arrows of outrageous Fortune,
Or to take Arms against a Sea of troubles,
And by opposing end them: to die, to sleep
No more; and by a sleep, to say we end
The heart-ache, and the thousand Natural shocks
That Flesh is heir to? ‘Tis a consummation
Devoutly to be wished. To die to sleep,
To sleep, perchance to Dream; Ay, there’s the rub,
For in that sleep of death, what dreams may come,
When we have shuffled off this mortal coil,
Must give us pause. There’s the respect
That makes Calamity of so long life:
For who would bear the Whips and Scorns of time,
The Oppressor’s wrong, the proud man’s Contumely, [poor]
The pangs of despised Love, the Law’s delay, [disprized]
The insolence of Office, and the Spurns
That patient merit of the unworthy takes,
When he himself might his Quietus make
With a bare Bodkin? Who would Fardels bear,
To grunt and sweat under a weary life,
But that the dread of something after death,
The undiscovered Country, from whose bourn
No Traveller returns, Puzzles the will,
And makes us rather bear those ills we have,
Than fly to others that we know not of.
Thus Conscience does make Cowards of us all,
And thus the Native hue of Resolution
Is sicklied o’er, with the pale cast of Thought,
And enterprises of great pitch and moment, [pith]
With this regard their Currents turn awry, [away]
And lose the name of Action. Soft you now,
The fair Ophelia? Nymph, in thy Orisons
Be all my sins remembered.

वरील संवाद हॅम्लेटच्या तिसर्‍या अंकातील पहिल्या दृश्याचा पहिलाच संवाद आहे. हॅम्लेट आपल्या मनातले भाव या संवादातून व्यक्त करतो. तिसर्‍या अंकातले हे दृश्य “ननसी सीन” म्हणून ओळखले जाते. शिरवाडकर महाशयांनी या संवादाचे शब्दश: भाषांतर करून आपल्या नाटकात घेतले.

प्रतिभावंत नव्हे उचल्या!
भाषांतर करण्यात काय आले आहे कौतुक? ही शुद्ध उचलेगिरी आहे. मराठीच्या वाङ्मय व्यवहारात दुहेरी उचलेगिरी चालते.एखाद्याने शेक्सपिअर किंवा अन्य पाश्चात्य लोकांच्या कलाकृती जशाच्या तशा उचलून प्रसिद्ध करायच्या आणि जातीय प्रसारमाध्यमांनी ही उचलेगिरी उचलून धरायची! उचलेगिरीलाच प्रतिभा ठरवून उदो उदो करायचा. शिरवाडकरांचे हेच झाले आहे. त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांतून उचलेल्या कलाकृतींना असेच उचलून धरण्यात आले. तथापि, सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच असते. आज ते आले. वि. वा. शिरवाडकर ही व्यक्ती नाटककार या नात्याने प्रतिभावंत नव्हतीच. ती होती केवळ एक उचल्या! कटू असले तरी हेच सत्य आहे. शिरवाडकरांनी शेक्सपिअरच्या मॅकबेथ या नाटकाचे राजमुकूट या नावाने रूपांतर केले. ऑथेल्लो त्यांचे रुपांतर ऑथेल्लो या नावानेच प्रसिद्ध आहे. ही सगळी नाटके मराठीत गाजली. याचे कारण मूळच्या शेक्सपिअरच्या संहिताच मजबूत आहेत.

इंग्रजी शिकल्याचा असाही गैरफायदा

वि. वा. शिरवाडकर शाळेत असताना शिरवाडकर नाशकात त्यांच्या मामांकडे राहत. मामांना शेक्सपिअरच्या नाटकांचा नाद होता. त्यांच्याकडे शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह होता. ही नाटके शिरवाडकरांच्या हाती पडली. इंग्रजीत शिक्षण झाले असल्यामुळे त्यांना ही नाटके वाचणे शक्य झाले. त्याकाळी शिक्षणाचा प्रसार कमी होता. त्यातल्या त्यात इंग्रजी जाणणारे तर विरळाच. “वासरांत लंगडी गाय शहाणी’ अशी एक म्हण मराठीत आहे. आजूबाजूला सगळीच वासरे असतील, तर लंगडी असली तरी गाय भाव खाणारच. कुसुमाग्रजांच्या काळातील साहित्यिक मंडळींत इंग्रजी जाणणारे असे जवळपास कोणी नव्हतेच. त्याचा फायदा कुसुमाग्रजांना झाला. इंग्रजी जाणारे कुसुमाग्रज भाव खाऊन गेले. कारण वासरांच्या गर्दीत ते एकटेच गाय होते.

येथे युक्तिवाद असा केला जाऊ शकतो की, भाषांतरे किंवा रूपांतरे साहित्यक्षेत्रासाठी आवश्यकच असतात. त्यामुळे शिरवाडकरांना अगदीच क्षुल्लक ठरविणे चूक आहे. हा युक्तिवाद योग्य वाटत असला तरी, तो चूक आहे. भाषांतरे, रूपांतरे आवश्यक असली तरी त्यांच्या बळावर कोणाला महान ठरविता येऊ शकत नाही. महत्ता ही अस्सल कलाकृतींच्या आधारावरच ठरत असते. इतकेच काय या कलाकृतींमधील प्रतिमा आणि प्रतिकेची देशीच असतात. टॉलस्टॉय हा आधुनिक जगातील सर्वोच्च पातळीवरील महाकवी म्हणून नावाजिला जातो. त्याची “युद्ध आणि शांती” ही ३०० पात्रे असलेली कादंबरी महाकाव्य समजली जाते. ती रशियन युद्धावर अधारित आहे. त्यातील सर्व पात्र अस्सल रशियन आहेत. टॉलस्टायवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. तो त्याने विचारांपुरताच मर्यादित ठेवला. कलाकृती साकारताना त्याने अस्सल रशियन पेहराव सोडला नाही.

जगातील दुसरे महाकाव्य म्हणून मॅक्झिम गॉर्कीच्या “द मदर” या कादंबरीचे नाव घेतले जाते. ही कादंबरीही अस्सल रशियन आहे. रशियातील बोल्शेविक क्रांतीचा इतिहास गोर्कीने या कादंबरीत मांडला आहे. एर्नेस्ट हेमग्वे, चार्लस् डिकन्स, डोस्टायवस्की, खलिल जिब्रान आणखी काही नावे वानगीदाखल येथे देते. हे सर्व लेखक महान या बिरुदाचे मानकरी ठरले ते केवळ त्यांच्या अस्सल कलाकृतींमुळे. रूपांतरीत कलाकृतींमुळे नव्हे. अलिकडचे अनेक मोठे हिंदी सिनेमावाले इंग्रजी सिनेमांतून कल्पना आणि दृश्ये जशीच्या तशी उचलतात. हे लोक निर्माते म्हणून मोठे असतीलही परंतु महान ठरत नाहीत. पथेर पांचाली सारखे अस्सल बंगाली सिनेमे देणारे सत्यजित राय हेच महान ठरतात. ऑस्करवाल्यांनाही भारतात येऊन त्यांचा गौरव करावा लागतो. मराठीत मात्र उचल्यांनाच महत्ता देण्याचा अजब प्रकार घडत आला आहे.

खर्‍या महान लेखकांना समोर आणा
मराठीत आंतराष्ट्रीय तोडीच्या कलाकृती का निर्माण होत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु हे खरे नाही. मराठीत महान म्हणता येतील, अशा कलाकृती आहेत. तथापि, त्यांना उपेक्षेच्या गर्तेत ढकलून कुसुमाग्रज उर्फ शिरवाडकरांसारख्या बोगस लोकांचाच उदो उदो केला जातो. त्यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. मग खरे टॅलेंट जगासमोर येणार कसे. मराठी प्रसारमाध्यमांनी आता तरी आपली जातीय भूमिका सोडून खरे टॅलेंट समोर आणले पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्यानंतरचा आपला वाङ्मयीन इतिहास काळ्याकुट्ट पर्वाचा इतिहास ठरेल.

-अनिता पाटील, औरंगाबाद

( Anita Patil वरून साभार )

होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात..

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा वेळी बर्‍याच कार्यकर्त्यांकडे याचे उत्तर नसते. ते काहीतरी सांगून वेळ मारून नेतात.

वादासाठी मान्य करू कि सगळे ब्राम्हण वाईट नसतात, पण त्या चांगल्या ब्राम्हणांनी वाईट ब्राम्हणांचा कधी साधा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. जेंव्हा एखाद्या ब्राम्हणाची हरामखोरी उघडकीस आणून त्याच्या विरोधात काहीतरी करण्याची निर्णायक वेळ येते त्यावेळी सगळेच्या सगळे चांगले ब्राम्हण त्या वाईट ब्राम्हणाची बाजू घेतात. उदा. बाबा पुरंदरे ह्या ब्राम्हणाने शिवचरित्रात केलेली भेसळ जगजाहीर आहे, पण सगळे भट त्याला शिवशाहीर म्हणून त्याचा उदोउदो करतात. (त्याने आयुष्यात एकही पोवाडा लिहिला नाही तरी!)

एकाही चांगल्या ब्राम्हणाने जेम्स लेनला मदत करणार्‍या ब्राम्हणांना शिक्षा व्हावी म्हणून एक ओळ एखाद्या वृत्तपत्रात लिहिल्याचे ऐकिवात नाही. उलट अनंत देशपांडे नावाच्या भटाने सामना दैनिकात लेख लिहून एक उत्कृष्ट पुस्तक अशी भलावण केली होती. आणि बाबा पुरंदरे नावाच्या जगातील सगळ्यात मोठया शिवद्रोह्याने सोलापुरातील जनता बँकेच्या व्याख्यानमालेत त्या पुस्तकाचे “वाचनीय पुस्तक” म्हणून कौतुक केले होते. सगळे ब्राम्हण मुस्लिमांच्या विरोधात प्रचार करताना सवाल करतात कि “सगळे मुस्लीम दहशतवादी नसतात, पण सगळे दहशतवादी मुस्लीम कसे?” आणि अशा प्रचाराला आमचे भोळेभाबडे बहुजन बळी पडतात. त्याच धर्तीवर माझा सवाल आहे-

सगळे ब्राम्हण शिवद्रोही नसतात, पण सगळे शिवद्रोही ब्राम्हण कसे?

इस्लाम हा समतावादी धर्म असल्यामुळे आणि भारतात बर्‍याच शुद्रातीशुद्रांनी वैदिक ब्राम्हणी धर्माला कंटाळून इस्लामचा स्वीकार केल्यामुळे ब्राम्हण इस्लामचा द्वेष करतात. भारतातील मुस्लिमांना खरा विरोध ब्राम्हणांचा होता व अजूनही ब्राम्हण मुस्लिमांचा द्वेष करतात. या देशातील झालेले बॉम्बस्फोट भटांनी केले होते व असिमानंद याने दिलेल्या कबुलीजबाबात हे स्पष्ट झाले आहे. पांडे, पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग या ब्राम्हणी दहशतवाद्यांचे समर्थन सगळे ब्राम्हण करतात. आणि न्यायालयात त्यांच्यावर फुले उधळतात.

ब्राम्हण सरळ सरळ मुस्लिमांचा विरोध करू शकत नाही, कारण मुस्लीम त्यांना भारी पडतील. म्हणून भट मराठयांना मुसलमानांच्या विरोधात भडकवतात. एका ब्राम्हणाने फेसबुकवर बॉम्बस्फोट केल्याची व बाबरी पाडल्याची कबुली दिली आहे किती चांगले ब्राम्हण याचा विरोध करतात बघू. आता पर्यंतचा इतिहास आहे, ब्राम्हण त्यांचे मार्ग बदलतात पण ध्येय कधीच बदलत नाही आणि त्यांचे अंतिम ध्येय आहे बहुजनांना गुलाम ठेवणे.

Bramhani Terrorism

आजही या देशातील सगळे ब्राम्हण या देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट करून इथे हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी अण्णा हजारे या बहुजन मुखवट्याचा वापर सुरु आहे. भटी माध्यमे असा प्रचार करतात कि या देशातील एकूण-एक राजकारणी भ्रष्ट आहेत. त्यांची तिथे राहण्याची लायकी नाही वगैरे. आता पर्यंत राजा हा एखाद्या महाराणीच्या पोटी जन्माला येत होता पण आता तो मतपेटीद्वारे जन्माला येतो आणि तो जर नालायक निघाला तर ५ वर्षांनी त्याला घरी बसवता येते हि ताकद लोकशाही व्यवस्थेची आहे.

पण भटांच्या डोळ्यात हे खुपत आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक ते लोकपालच्या निमित्ताने लोकशाही व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उठेल असा प्रचार करत आहेत. मुळात लोकपाल नसतानाही भ्रष्ट लोक जेलमध्ये गेलेले आहेत. मग स्वतंत्र कायद्याची गरज काय? लोकपालची यंत्रणा उभी करण्यासाठी व चालवण्यासाठी ८०,००० कोटी रुपये खर्च दरवर्षी येणार आहे. तो कुठून येणार? पण अशा गोष्टींची चर्चा ब्राम्हणी प्रसारमाध्यमे कधीही करणार नाहीत. या देशातील सगळी ब्राम्हणी यंत्रणा ते त्यांच्या व्यवस्थेच्या समर्थनात, बहुजनांना गुलाम करून ठेवण्यासाठी वापरतात.

आमचा बहुजन समाज हा हजारो जातींमध्ये विभागून ब्राम्हणांनी त्यांची पोळी भाजून घेतली आहे. ब्राम्हण हा सर्व जगात ब्राम्हणच असतो. पण बहुजन कधी माळी, कधी मराठा, कधी धनगर, कधी चांभार असतो. काश्मीरच्या ब्राम्हण शिंकला कि कन्याकुमारीचा ब्राम्हण नाक पुसतो. एवढी एकसंध आणि क्रूर जमात अख्या जगात सापडणार नाही. म्हणून माझ्या बहुजन मित्रांनो ब्राम्हण कधीही चांगला किंवा वाईट नसतो, तो केवळ आणि केवळ ब्राम्हणच असतो.

ग्रामीण भागात एक म्हण आहे साप म्हणू नये धाकला आणि बामन म्हणू नये आपला! पण वैज्ञानिक आधारावर साप शेतकर्‍यांचा मित्र सिद्ध झालेला आहे जो उंदीर, घुशी इत्यादी उपद्रवी प्राणी खातो. म्हणून आता सुधारित म्हण ध्यानात ठेवा..

एकवेळ साप म्हणावा धाकला, पण बामन म्हणू नये आपला!