१७ जुलै १९६८ रोजी मुंबईत पहिल्यांदाच राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी केली गेली. त्यावेळी महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स यशवंतराव मोहितेंनी केलेले अद्वितीय भाषण. पुढील लिंक वर पहा : समाज क्रांतीचा द्रष्टा: श्री शाहू राजा
यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी